श्रीरंग बनसोडे हे दोन्ही डोळ्यांना मोतिबिंदूमुळे संपूर्ण दृष्टिहीन झाले होते आणि त्यामुळे त्यांचे जीवन अवलंबून होते. कळंब नेत्र शिबिराच्या माध्यमातून त्यांना आनंदऋषिजी नेत्रालयात आणण्यात आले. आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी टोपीकल अनेस्थेशिया (सुईशिवाय) शस्त्रक्रिया करून त्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले. आज त्यांना संपूर्ण दृष्टि प्राप्त झाली आहे! आता ते स्वत: चालू शकतात, स्वत:ची कामे करू शकतात आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतात. त्यांच्या डोळ्यातला आनंद आणि समाधानच सगळं काही सांगून जातं!